रॅायल वेडींग्सचा बोलबाला

लग्नसोहळा हा प्रत्येकाच्याच आयुष्यातला अविस्मरणीय दिवस असतो. प्रत्येकालाच तो खास आणि लक्षात राहण्यासारखा बनवायचा असतो. सध्याच्या लग्नसमारंभात पाहिलंत तर ‘रॉयल’पणा आला आहे. अगदी डेकोरेशन पासून कपड्यांपर्यंत सगळंच राजेशाही थाटात असतं. ह्यात फक्त नवरा-नवरी नाही तर संपूर्ण कुटुंबाचाच राजेशाही थाट असतो. व्हिवाच्याच एका लेखनातून आपण एकदा तरुणांचा पेशवाई लग्न थाट पहिला. कोविडच्या काळात लग्नसराई थांबल्या होत्या…

चोगडा तारा….!!!

गरबा हा एक अनोखा आणि मोहक नृत्य प्रकार आहे. अभ्यासायला गेलं तर त्याला जवळपास ५००० वर्षांपेक्षाही जास्त जुना असा समृद्ध वारसा आहे. मुक्त गुजराथी संस्कृतीतून पुढे आलेला हा प्रकार आता अख्या जगालाच हळू हळू भुरळ घालायला लागला आहे. गरब्यावर थिरकण्याचे, डोलण्याचे दिवस आता सुरू झाले आहेत. या नवरात्रीत गरबा खेळायचा म्हणून जवळपास महिना-दोन महिने आधीपासून…

नव्याकोऱ्या चोळीचा साज

एव्हाना घरांमध्ये साफसफाई, सामानांची यादी, डेकोरेशन, रांगोळ्या, नवीन कपडे, साड्या, दागिने या सगळ्याची लगबग सुरु झाली नसेल तर नवलच. दिवाळी हा सण सर्वांगानेच किती परिपूर्ण आणि दिमाखदार आहे! खायची, नटायची, मज्जा करायची, सजावट करायची सगळीच हौस या एका सणात मनसोक्त करता येते. वर्षाअखेरच्या सुट्ट्या, हळूहळू पडणारी थंडी, घरात गोड आणि चमचमीत फराळाचा सुगंध, उटण्याचा दरवळ,…

व्यवसायातील गिफ्टिंगचे नवीन ट्रेंड्स

     सगळ्या सणांच्या तुलनेत दिवाळीत जो काही थाट माट असतो त्याला काहीच सीमाचं नसते. कपडे, दागिने, सजावट या सोबतच आवडीचा विषय असतो तो म्हणजे भेट-वस्तू! दिवाळी हक्काचं निमित्त असतं जेव्हा भरगोस भेट-वस्तूंची देवाण-घेवाण करता येते. पाडवा, भाऊ-बीज, लक्ष्मी पूजन या दिवसांमध्ये मित्र-मंडळी, आप्तेष्ट, नातेवाईक भेटतात त्या निमित्ताने प्रत्येकासाठी काहीतरी छान गिफ्ट घेतलं जातं. आजकाल इतक्या…

नव विचारांची गुढी

असं म्हणतात होळी पौर्णिमा झाली की ऋतु बदलतात. निसर्गाचं यावर्षीचं चक्र संपतं आणि तो जणू नवीन वर्षाची वाट पाहत असतो. निसर्ग नेहमीच आपल्याला त्याच्या पद्धतीने ऋतु बदलाचे, वातावरण बदलाचे संकेत देत असतो कारण बदल हा अनिवार्य आहे. दर दहा वर्षांनी पिढीसुद्धा बदलते. मग त्या नव्या पिढीचे नवे आचार-विचार जगात रूजायला सुरूवात होते.आपल्या पुर्वजांनी आपल्याला ‘जुनं…

आरतीत तेवे माझ्या विज्ञान व्रताची समई

आकाशाचा रंग निळा का असतो? दिवसा तारे कुठे जातात? पावसाचं पाणी नक्की कुठुन येतं?  वेगवेगळे ऋतु नेमके कसे बदलतात? असे अनेक प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाला लहानपणी पडत असतात. त्याची अनेक गंमतीशीर उत्तरं सुद्धा मिळतात. ती आपल्याच बालमनाने शोधलेली असतात किंवा इतर मोठ्या माणसांकडून मनाचं समाधान करण्यासाठी मिळालेली असतात. त्या वयात जी उत्तरं आपल्याला शोधता येतात ती…

सोशल मिडीयावर हॅकींगचे सावट

२००४ साली फेसबुकचा जन्म झाला त्याच बरोबर व्हाट्सअँप, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, लिन्क्डइन सारख्या समाजमाध्यमांची आता मांदियाळी झाली आहे. सोशल मीडिया ही एक दुधारी तलवार आहे असे म्हणतात. त्याचे जितके सदुपयोग आहेत तितकेच दुरुपयोगही आहेत. त्याचा वापर, पद्धत, फायदे, तोटे हे कळले नाही तर त्यातून मदत होण्यापेक्षा त्रासच जास्त होऊ शकतो. सोशल मीडिया आता फक्त फेसबुक, व्हाट्सअँप…