missvaidya09@gmail.com

missvaidya09@gmail.com

तरूणांचा पेशवाई थाट

लग्नसोहळा हा प्रत्येकाच्याच आयुष्यातला अविस्मरणिय क्षण असतो किंबहुना प्रत्येकाला तो तेवढा खास बनवायचा असतो. हल्लीच्या लग्न समारंभात पेशवाई थिम पुन्हा एकदा लोकप्रिय होताना दिसतेय. अंगरखा, पगडी, शिरपेच, मोती पोळ्याच्या माळा, नववारी, दागिन्यांचा साज आणि बरंच काही… या सगळ्या थाटमाटात तरूणांची लगीनघाई सध्या दिसून येत आहे.…

केक आणि बरचं काही

काही वर्षांपुर्वी एखाद्या वाढदिवसाचे बोलवणे आले की एकचं अप्रुप असायचे ते म्हणजे केकचे. त्यावेळी व्हॅनिला आणि चाॅकलेटचे काॅंबिनेशन असलेला, रेड चेरीने सजविलेला केक हेच आकर्षण होते. तसा केक घरात आला म्हणजे काहीतरी खास आहे असे वाटायचे. ब्लॅक फोरेस्ट, पाईनॲपल, डार्क चाॅकलेट…

चार चाकांचे वेड

प्रत्येकालाच कुठल्याना कुठल्या गोष्टीचं वेड असतं. पण त्या वेडाचे ध्यासात रूपांतर झाले तर तोच खरा कलाकार ठरतो. जो आपल्या क्षेत्रात नावीन्य आणण्याचा प्रयत्न करतो, किंबहुना जो स्वत:वर आणि स्वत:च्या स्वप्नांवर विश्वास ठेवून ते सत्यात उतरवण्याचे धाडस करतो तो प्रत्येकजण कलाकारच…

वसुधैव कुटुम्बकम्

आजचा दिवस हा ‘जागतिक कुटुंब दिवस’ म्हणून जगभर साजरा केला जातो. भारतीय परंपरेत कुटुंबसंस्थेला खूप महत्त्व आहे. मुळात भारतीय संस्कृतीच ही कुटुंबवत्सल संस्कृती आहे. जगभरात पाश्चात्यकरणाचे वारे वाहू लागले आणि विभक्त कुटुंब पद्धत उदयाला आली. या पार्श्वभूमीवर भारतात आजही एकत्र…

काचा पाणी

या नावाचा खेळ आपल्या आई-आजीच्या काळात खूप लोकप्रिय होता. हातांच्या ओंजळीतून काचांचे तुकडे जमिनीवर पसरायचे आणि त्यातल्या सुटे सुटे तुकडे इतर काचांना न हात लावता वेचायचे. अगदी सोपा आणि सहज! पण पूर्वीच्या काळाची हीच तर खासियत होती. छोट्या छोट्या गोष्टीतून…

ब्रिडा

पाउलो कोएलो हे नाव ‘अलकेमिस्ट’ या पुस्तकामुळे तरूणांमध्ये लोकप्रिय झाले. मुळत: ब्राझिलियन असलेला हा लेखक त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण कथानकाने तरूण वाचकांना आकर्षित करतो. या लेखकाचे कथानक सातत्याने  अद्भुत शक्ती, अंतर्मन, अशा विविध वलयांकित विषयांवर असते. त्याचा मूळ गाभा कोणा एका व्यक्तीवर असतो…

प्रजासत्ताक दिनाचे महत्व

दै. लोकसत्ता मध्ये दि. २४/१/२०२५ रोजी प्रकाशित १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळाले. परंतु फक्त तेवढेच पुरेसे नव्हते. देश म्हणून जगासमोर वाटचाल करताना राज्यघटना, कायद्यांची तरतूद, शासन, अर्थव्यवस्था या सगळ्यांची आवश्यकता असते. भारत देश लोकांचे राज्य होण्याची…

ढील दे ढील दे रे भैय्या

दै. लोकसत्ता मध्ये दि. १०/१/२०२५ रोजी प्रकाशित थंडीतल्या सणांची एक वेगळी मजा असते; त्यातली फॅशन, पदार्थ, उत्सव, समारंभ सगळंच थंडीतले वातावरण लक्षात घेऊन केले जाते म्हणून त्यात इतर सणांपेक्षा वेगळेपण असते. याच थंडीतला नवीन वर्षातला पहिला सण येऊन ठेपलाय…. मकर…

गद्दे पंचविशी: ओढ मातीची

दै. लोकसत्ता  मध्ये दि. ३/१/२०२५ रोजी प्रकाशित  या शतकातली २५ विशी म्हणजेच २०२५ सुरु झाले आहे. सरत्या वर्षाच्या कडू-गोड़ आठवणी अजूनही मनात रेंगाळत असतील. परंतु आयुष्यातल्या पंचविशीत जसा नवीन अध्याय सुरु होतो तसेच हे वर्ष पण नवीन अध्याय समजून त्याला…

रॅायल वेडींग्सचा बोलबाला

लग्नसोहळा हा प्रत्येकाच्याच आयुष्यातला अविस्मरणीय दिवस असतो. प्रत्येकालाच तो खास आणि लक्षात राहण्यासारखा बनवायचा असतो. सध्याच्या लग्नसमारंभात पाहिलंत तर ‘रॉयल’पणा आला आहे. अगदी डेकोरेशन पासून कपड्यांपर्यंत सगळंच राजेशाही थाटात असतं. ह्यात फक्त नवरा-नवरी नाही तर संपूर्ण कुटुंबाचाच राजेशाही थाट असतो.…

en_USEnglish